नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कालपासून महाराष्ट्रातून देशांतर्गत विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु झाली आहे. या माध्यमातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी केली आहे. त्यानुसार राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारला जाणार आहे.

तसंच त्यांनी १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक केलं आहे. तसंच सुरक्षित अंतराचे नियम पाळत प्रवाशांना वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल. मात्र कंटेनमेंट झोनमधून हा प्रवास करता येणार नाही.