नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात उपनगरी रेल्वेनं प्रवास करू न शकलेल्या मुंबई आणि उपनगरातल्या  पासधारकांचे पैसे परत करावेत अथवा रेल्वे सुरु झाल्यानंतर त्यांच्या मासिक पासाचा कालावधी वाढवून द्यावा,अशी मागणी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना काल पाठवलेल्या पत्रात केली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून रेल्वे बंद आहेत. उपनगरी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळ पास ८० लाख आहे.