नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत 29 ऑगस्ट2019 ला संपत आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना 25 जुलै2019 रोजी जारी होईल.निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2019 असून अर्जांची छाननी दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2019 आहे.निवडणुकीसाठी मतदान 19 ऑगस्ट2019 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी4.00 या वेळेत होईल. मतमोजणी 22ऑगस्ट 2019 रोजी होईल.

औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आज पासून तात्काळ प्रभावाने निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.