नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हॉकी  खेळाडूंना सामन्यातल्या विजयानंतर रोख वार्षिक प्रोत्साहन बक्षिस दिलं जाईल अशी घोषणा काल भारतीय  हॉकी महासंघानं केली. खेळाच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यावर खेळाडूंना वार्षिक पन्नास हजार रोख आणि खेळाडू संघाच्या कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपये रोख बक्षीस दिले जाईल. या घोषणेमुळे जानेवारीत होणार असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी तसंच आशियायी स्पर्धेसाठी संघाचा उत्साह वाढेल असं भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी म्हटलं आहे. जानेवारीत १३ ते २९ या दरम्यान होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे.