नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे. त्यासाठी काल रात्री झालेल्या निवडणुकीत संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्यीय आमसभेत भारतानं १८४ मतं मिळवली.

दोन वर्षांसाठी ही निवड झाली आहे. भारताबरोबरच आयर्लंड, मेक्सिको, आणि नॉर्वे या देशांचीही निवड झाली आहे.