नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात निपाणी इथं १३ वर्षाच्या मुलीचा होणारा बालविवाह पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रोखला.

शहरातल्या चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानं त्यांनी अल्पवयीन वधु- वरांच्या पालकांचं समुपदेशन केलं. तसंच अल्पवयीन मुलीला औरंगाबाद इथल्या बालगृहात ठेवण्याची व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं.