नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि  श्रीलंके दरम्यान  होणाऱ्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आसाम राज्यातल्या गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियममध्ये आज होणार आहे.

दुखापतीमुळे दीर्घ काळ संघाबाहेर राहणार्‍या जसप्रित बुमराह आणि शिखर धवन यांचं संघात पुन्हा आगमन झालं आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका जिंकून भारत आत्मविश्वासानं मालिकेत उतरत आहे. मात्र श्रीलंकेला याआधीच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून 3-0, असा पराभव स्वीकारावा लागला आहे.

आजचा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. आकाशवाणीच्या एफएमरेनबो वाहिनीवर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री साडेदहा पर्यंत या सामन्याचं धावतं समालोचन केलं जाईल. एफ. एम रेडिओच्या सर्व वाहिन्यावरदेखील याचं प्रसारण होईल.