नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा तेरावा भाग आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.