नवी दिल्ली : चीननं भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनला जाहीरपणे खडे बोल सुनवावेत, आणि चीनविरोधात त्वरीत कठोर कारवाई करून, भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला वाद निकाली काढावा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करावं आणि भारताचा भूभाग बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मागे सारलं जाईल याबाबत आश्वस्त करावं, यासाठी संपूर्ण देशासोबतच सगळे विरोधी पक्षही सरकारच्या बाजूनंच आहेत, असं काँग्रेसचे जेष्ठ नेते कबील सिब्बल यांनी म्हटलं आहे.

ते आज ऑनलाईनपद्धतीनं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. गलवान खोऱ्यात नेमकी परिस्थिती काय आहे याविषयीची वस्तुस्थिती प्रधानमंत्र्यांनी देशासमोर मांडायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.