नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता कोणत्याही कारणाने घरापासून दोन किलोमीटर परिघाबाहेर जाऊ नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

कार्यालयात जाणारे आणि तातडीच्या वैद्यकीय कारणासाठीच परवानगी दिली जाईल. खरेदीच्या कारणासाठी दोन किलोमीटर परिघाबाहेर जाणं निषिद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

वैयक्तिक सुरक्षा आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचं कोटेकोर पालन करावं. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. दोन किलोमीटरच्या परिघात मोकळ्या जागांवर व्यायामासाठी बाहेर पडण्यालाही सक्त मनाई आहे.