नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवाशांनी १ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीतल्या नियमित गाड्यांच्या आरक्षित केलेल्या रेल्वे तिकीटाचे सर्व पैसे परत देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.  नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या सर्व गाड्या रेल्वेनं नुकत्याच १२ ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.