नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्हा आणि तालुका प्रशासनानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या असून शिर्डी इथं श्री साई मंदीरात भाविकांना प्रवेश बंद केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या साई मंदीरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नाही.

भाविकांना आणि विविध ठिकाणांहून येणाऱ्या पालख्यांना प्रशासनातर्फे पासही  देणार नसून भाविकांनी पालख्या शिर्डीत आणू नयेत असं आवाहन जिल्हा आणि तालुका प्रशासनानं केलं आहे.