नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते.

कोरोनाच्या संकटात नेतृत्व करणाऱ्या प्रमुख लोकांनी बाहेर पडणं, गर्दी करणं गरजेचं नाही, संवादाची अनेक माध्यमं उपलब्ध आहेत, त्यामुळे नेतृत्वावर टीका करणं योग्य नाही, असं पवार म्हणाले.

टाळेबंदीचा सगळ्याच व्यवसायावर परिणाम झाला असून, यातून सावरण्यासाठी सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं उद्योगांना मदत करावी, असं पवार म्हणाले.