नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन ला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि या प्रश्नाबाबत त्यांनी कोणताही सल्ला देऊ नये तसंच, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये असं. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी  म्हटलं आहे.

जम्मूकाश्मीर संदर्भात चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्त्व्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांची ही प्रतिक्रिया दिली.