नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्या पार्थिवाचे हैदराबाद येथे अंत्यदर्शन घेतले. रेड्डी यांचं हैदराबाद येथे निधन झाले. या काँग्रेस नेत्याच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी आदरांजली अर्पण केली. रेड्डी यांच्या कुटुंबियांचे, उपराष्ट्रपतींनी सांत्वन केले.

इंग्रजी आणि तेलगू या दोन्ही भाषांवर उत्तम प्रभूत्व आणि वक्तृत्व असणारा विद्‌वान नेता, जनतेच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे व्यक्तीत्व अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.