मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले महाआघाडी सरकार कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात जास्त रस घेत आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. ते आज पूरग्रस्त विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर असताना नागपूर इथं बोलत होते.

बदल्यांसंदर्भात घटक पक्षात समन्वयच नसल्याचं सांगून, बदल्या आवश्यक असल्या तरी कोविडच्या पार्श्वभूमीवर त्या रोखल्यामुळे मोठा फरक पडणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.