नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेती आणि पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी कृषी पत पुरवठा आराखड्यानुसार नाशिक जिल्ह्यातल्या शेतक-यांना २ हजार १३७ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचं  वाटप करण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६१४ कोटी रूपयांनी अधिक आहे.

यंदा खरीप हंगामासाठी एकुण कर्ज वितरणाचं उद्दीष्ट ३ हजार ३०३ कोटी इतकं असून सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत २ हजार १३७ कोटी रूपयांचं  वाटप करण्यात आललं  आहे.