कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे सर्व मार्ग बंद झाल्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज,गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड,कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या बाराही आगारातील सर्व एस.टी. फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वाहतुकीचे सर्व मार्ग पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या सर्व आगारातील एसटी फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली आहे.