नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ३६ हजार ५५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ५२६ जणांचा मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९५ लाख ३४ हजार ९६५ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ३८ हजार ६४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काल ४० हजार ७२६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडलं. देशात आतापर्यंत ८९ लाख ७३ हजार ३७३ रुग्ण बरे झाले असून, सध्या चार लाख २२ हजार ९४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

काल ११ लाख ११ हजार ६९८ कोविड चाचण्या झाल्या, देशभरात आतापर्यंत १४ कोटी ३५ लाख ५७ हजार ६४७ चाचण्या झाल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.