नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ३६ हजार अकरा रुग्ण आढळले असून ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४१ हजार ९७० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशातल्या या संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या ९६ लाख ४४ हजार २२२ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यातले सुमारे ९१ लाख रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून सध्या चार लाख तीन हजार २४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४० हजार १८२ झाली आहे.