नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई, पुणे तसंच राज्यातल्या इतर प्रतिबंधित क्षेत्रांमधून कोणालाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात यायची परवानगी देऊ नका अशी विनंती, सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रातल्या जिल्ह्यांसह इतर काही जिल्ह्यांचे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे.

सिंधुदुर्गात संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता अपुरी पडू लागली आहे, तसंच स्थानिक आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या नाकरिकांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.