NOIDA, DEC 8 (UNI):- Security beefed up in Noida during Bharat Bandh called to support the farmers protesting against the Farm Laws, in Noida on Tuesday. UNI PHOTO-16U

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज सकाळी ११ ते दुपारी ३ या काळात बंदचं आवाहन केलं आहे.

दिल्लीच्या चार सीमा आज बंद राहणार असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ देखील वाहतुकीसाठी बंद असेल, असं दिल्ली वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.