मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ७१७ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ८० हजार चारशे सोळा झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार २०९ झाली आहे.

तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका आहे. काल तीन हजार ८३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ५७ हजार पाच रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ४४ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ७४ हजार १०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.