नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात २६ हजार ३८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ३८७ जणांचा मृत्यू झाला.

देशात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या ९९ लाख ३२ हजार ५४८ झाली आहे. तर, या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १ लाख ४४ हजार ९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काल ३३ हजार ८१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ९४ लाख ५६ हजार ४४९ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन लाख ३२ हजार २ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.