नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काही वर्ष आपली संपूर्ण ताकत आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या उद्योग समूह आणि व्यवसायांना केलं. ‘असोचेम फाउंडेशन सप्ताह 2020 या कार्यक्रमात आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण केलं.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते टाटा उद्योग समूहाला ‘असोचेम एंटरप्राईज ऑफ द सेंचुरी’ हा पुरस्कार देण्यात आला. टाटा समूहाच्या वतीनं रतन टाटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशाच्या विकासात टाटा उद्योग समूहाचं महत्त्वाचं योगदान आहे, असं मोदी म्हणाले.