नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ विचारवंत, दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासाठी त्यांनी अनेक दशकं मोठं योगदान दिलं असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.