नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ तारखेला देशविदेशातील भारतीयांशी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत.

मन की बातचा हा ७२ वा भाग सकाळी ११.०० वाजता प्रसारित केला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले विचार नमो अॅप, माय जीओव्ही व्यासपीठ किंवा १८०० – ११ – ७८०० या टोल फ्री क्रमांकावर पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.