नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चेची दहावी फेरी आज नवी दिल्ली इथं होणार आहे. यापूर्वी ही बैठक काल होणार होती पण एका दिवसासाठी तहकूब करण्यात आली होती.

संघटनांना आपापसात अनौपचारिक गट तयार करावा आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारला मसुदा सादर करावा. असं कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना सांगितलं.दिल्लीत सध्या असलेल्या थंड हवामानबाबत आंदोलन करणार्याग शेतकर्यां ची सरकारला चिंता आहे. चर्चेच्या माध्यमातून लवकरच तोडगा निघेल, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं प्रतिपादन तोमरयांनी केलं.