मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत उपनगरी रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आयोजित बैठकीत आढावा घेतला. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्यानं गर्दी होऊ नये अशा पद्धतीनं उपनगरी सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल, यादृष्टीनं विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाली.