नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी सेवांमधल्या जवानांसाठी ४५५ शौर्य आणि इतर पुरस्कारांना मान्यता दिली आहे. एक महावीर चक्र सन्मानासह, ५ कीर्ति चक्र, ५ वीर चक्र, ७ शौर्य चक्र सन्मानांचा यात समावेश आहे. गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी झालेल्या संघर्षात वीरमरण आलेले बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र सन्मान जाहीर झाला आहे.