मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह देशातल्या काही भागांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये,  परदेशात नव्यानं आढळलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग नसल्याचं ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना संदर्भात  N४४०K आणि   E४८४Q या नव्या व्हायरस प्रारूपाचा संसर्ग परदेशात दिसून आला आहे. मात्र देशात याबाबत ठोस अहवाल नसल्याचं त्यांनी म्हटलंय.