नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २ कोटी ५० लाख ६५ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ४ लाख ६२ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.

काल २१ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ कोटी ११ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशभरात ३ लाख ३४ हजारापेक्षा जास्त सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काल ४६ हजार ९५१ नवे रुग्ण आढळले.

त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १ कोटी १६ लाखाच्या वर गेली आहे. काल २१२ रूग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या १ लाख ३९ हजार ९६७ इतकी झाली आहे.