मुंबई (वृत्तसंस्था) : बुधवारी रात्रीपासून सुरु झालेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकमान्य टिळक स्थानकाबाहेर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी लोकांची गर्दी दिसून आली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि शासकिय रेल्वे पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करावी लागली.

रेल्वेच्या गाड्या नेहमीप्रमाणे चालूच राहणार असून गरजेनुसार अतिरिक्त गाड्याही सोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नये आणि स्थानकांमधे गर्दी करु नये, असं आवाहन मध्य रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.

कन्फॉर्म टिकट असणाऱ्या प्रवाशांना गाडीत बसण्याची परवानगी दिली जाईल. त्यांनी गाडी सुटण्याच्या वेळेच्या फक्त दीड तास आधी स्थानकावर यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.