मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे निघणारी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पायी वारी प्रस्थान सोहळा करोनामुळे आज औपचारिक स्वरूपात साजरा झाला.

त्र्यंबकेश्वर इथल्या निवृत्तीनाथ समाधी मंदिरातून निघालेली निवृत्तीनाथांची पालखी मंदिर प्रदक्षिणा करून मंदिरामध्ये विसावली असून करोना स्थितीमुळे शासनाच्या नियमानुसार आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी एसटी बस द्वारे चाळीस वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे.