नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३८ लाख ७८ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. आतापर्यंत या लशींच्या ३९ कोटी ५३ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.  देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक २८ शतांश टक्के आहे. काल ४० हजार २६ रुग्ण बरे झाले, ३८ हजार ९४९ नवे रुग्ण आढळले. तर, ५४२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख १२ हजार ५३१ वर पोचली आहे. सध्या देशभरात ४ लाख ३० हजार ४२२ रुग्ण उपचाराधीन आहेत.