नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. काल ४५ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी ३ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३० हजार नवे रुग्ण आढळले. तर, ३७४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख १४ हजाराच्या वर गेली आहे. देशभरात सध्या ४ लाख ६ हजार १३० रुग्ण उपचाराधीन आहेत.