मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित खाली आला आहे. काल ४ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ५ हजार ५०८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५१ रुग्ण दगावले. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ५३ हजार ३२८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६१ लाख ४४ हजार ३८८ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३३ हजार ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ७१ हजार ५१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ७१ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १ दशांश टक्के आहे.