मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ३८८ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६३ लाख ७५ हजार ३९० झाली आहे. काल २०८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३४ हजार ५७२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक अकरा शतांश टक्के झाला आहे. काल आठ हजार ३९० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६१ लाख ७५ हजार १० रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ८६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ६२ हजार ३५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.