मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विशेष कार्यक्रम राबवणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्या काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुढच्या दोन वर्षांत यासंदर्भात मोठा बदल घडवून येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. सध्याचं केंद्र सरकार दडपशाही करणारं सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा राजकीय सूडबुद्धीने होणारा वापर लोकशाहीसाठी घातक असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.