मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचं सक्षमीकरण केलं जात आहे. त्यानुषंगानं विभागातली सर्व रिक्त पदं भरली जाणार आहेत. त्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या शनिवारी आणि रविवारी होत असून ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडली जाणार असल्याचं राज्याच्या आरोग्य संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.