मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात गेले काही दिवस कोविड १९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असल्यानं कोरोनामुक्तीचा दर सातत्यानं वाढत आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत, आता ४० हजाराच्या खाली आली आहे.काल राज्यभरात ४ हजार २८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ६०८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ३१ हजार २३७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख ४९ हजार २९ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ३८ हजार ६६४ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ३९ हजार ९८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक २१ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.