नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलीयाच्या महिला क्रेकट संघांदरम्यान ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या दिवस रात्र  कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारताच्या स्मृती मंधानानं शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिनं १२७ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं ४ बाद २७४ धावा केल्या होत्या.