मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल  2 हजार 413 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 63 लाख 94 हजार 75 वर पोचली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 97 पूर्णांक 32 शतांश टक्के झालं आहे. काल 2 हजार 681 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. सध्या राज्यात 33 हजार 397 रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोनामुळे काल 49 बाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातला मृत्यूदर 2 पूर्णांक 12 शतांश टक्के इतका आहे.