मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण आज पूर्ण झालं. राज्यात काल ४ हजार ५८० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ५ लाख २८ हजार ८५३ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात कालपर्यंत ९ कोटी ५८ लाख ८ हजार ६२३ मात्रा लाभार्थांना दिल्या असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. त्यापैकी ६ कोटी ६० लाखांहून अधिक नागरिकांना पहिली मात्रा मिळाली असून ३ कोटी ६५ लाखाहून अधिक नागरिकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या एकशे दोन कोटी ९६ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यापैकी ३१ कोटी २ लाख नागरिकांना लशींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या असून इतरांना पहिली मात्रा मिळाली आहे.  काल ६४ लाख ७५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.