नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड- १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल १४ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३ कोटी ३५ लाख ९७ हजार ३३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल १३ हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. सध्या देशात १ लाख ६२ हजार ६६१ रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत बाधित झालेल्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी, ४८ शतांश टक्के आहे.