मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ चे ७६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६५६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३० हजार ५३१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ७६ हजार ४५० रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४० हजार ७४७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ९ हजार ६७८ एक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के झालं आहे, तर मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.