नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पवयीन मुलांवरील अत्याचारासह सायबर क्राइमशी संबंधित व्यापक गुन्ह्यांविरोधातली यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं, विविध हितसंबंधींशी चर्चा करून उपाययोजना सुरु केल्या आहेत अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. २०१९ या वर्षात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराशी संबंधित ३०६, तर २०२० या वर्षात १ हजार १०२ सायबर गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी सभागृहाला एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. भारतात इंटरनेट सेवा मुक्त, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तरदायी असावी यासाठीची धोरणं राबवण्याकरता केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं.