नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आजपर्यंत १६२ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ६८ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दोन मात्रा, तर ७९ लाख ५७ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ या वयोगटात आत्तापर्यंत ४ कोटी २० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. आज सकाळपासून देशभरात सुमारे २५ लाख नागरिकांचं लसीकरण झालं.

राज्यात आज सकाळपासून १ लाख ११ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १४ कोटी ६१ लाख ५६ हजाराच्या वर गेली आहे. त्यात ५ कोटी ९८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दोन मात्रा, तर ६ लाख २३ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८  वर्ष वयोगटातल्या २९ लाख ४३ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशींची पहिली मात्रा मिळाली आहे.