नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात भाग घेण्याकरता नोंदणी करण्यासाठीची आज शेवटची तारीख आहे. या कार्यक्रमाचं हे पाचवं वर्ष आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीचा कार्यक्रमही ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. या कार्यक्रमासाठी इयत्ता ९वी ते १२वीचे विद्यार्थी, शिक्षक तसंच पालकांची निवड ऑनलाईन स्पर्धेच्या मार्फत केली जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात. या संवादात ते परीक्षेमुळे येणाऱ्या तणापासून कशी सुटका करून घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करतात.