नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली. ५० धावांच्या भारताचे सलामीवीर तंबूत परतले होते. रोहित शर्मा ५ तर रिषभ पंत आणि विराट कोहली प्रत्येकी १८ धावा काढून बाद झाले. ओडियन स्मिथनं १२ व्या षटकात रिषभ पंत आणि विराट कोहलीचे बळी टिपले. या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सध्या के. एल. राहुल आणि सुर्यकुमार यादव खेळत आहेत. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या २८.१ षटकात ३ बाद १२३ धावा झाल्या होत्या.